Wednesday, September 21, 2022

कच्छवा लगाव मच्छर भगाव :एलसीबीला चिटकून बसलेल्या रक्तपिपासू डासांच्या निर्मूलनासाठी कधी होणार कारवाई ?


नांदेड :
  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या एलसीबी विभागाकडे सर्वसामान्य नागरिकांचे नेहमीच लक्ष असते. परंतु गेल्या काही वर्षापासून एलसीबी म्हणजे आयो चोरों बांधो भारा आधा तुम्हारा आधा हमारा अशी गत झाली आहे .एवढेच नाही तर या एलसीबीला काही रक्तपिपासू मच्छर असे घट्ट चिकटले की स्वतः श्रीमंत होण्यासाठी वाटेल ते करण्यासाठी तयार आहेत. एवढेच नाही तर कायद्याच्य पिंजऱ्यातल्या अधिकारयाला सिंह म्हणून संबोधन्याची लाजिरवाणी बाबही अशा मच्छरांकडून होत आहे. त्यामुळे आता या मच्छरांच्या संपूर्ण बंदोबस्त करण्यासाठी कच्छवा अगरबत्ती ची गरज असून लवकरच या विभागात कछवा लगाव मच्छर भगाव अशी प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती प्राप्त होते आहे.
गेल्या काही वर्षापासून नांदेड जिल्ह्यात भुरट्या भामट्या आणि स्वंघोषित पत्रकारांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे अधिकाऱ्यांना धमकावणे दरडावने त्यांची गुप्त माहिती मिळवून त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे, गाड्या घोड्या घेणे. स्वतःवर असलेले कर्ज फेडण्यासाठी अधिकाऱ्याला सांगणे. आर्थिक माया गोळा करणे. असे खंडणी बहाद्दर पत्रकारिता करणाऱ्यांचा सध्या पोलीस दलातही मोठा शिरकाव झाल्याची जोरदार चर्चा आहे. काहीजण तर स्वतःला अक्षरशः बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज समजू लागले आहेत. ज्यांचा आणि व्याकरणाचा कवडी मात्र संबंध नाही ,अलंकारिक भाषा तर सोडाच पण जे नांदेड शहरातील महत्त्वाच्या गल्लीत चाकू घेऊन फिरत होते ते लोक आता आपल्या लेखणीच्या टोकाला बरची, भाला समजून अधिकाऱ्यांना धमकावू लागले आहेत. काही वेळा अधिकार्याना इतके पाणी मारले जाते कि, त्या अधिकार्यांचे गुप्तांग गळून पडेल अशी लाजीरवाणी परिस्थिती निर्माण केली जात आहे. त्यामुळे नको ती किरकिर म्हणून आपण कमावलेल्या वरकमाईतील काही पैशाचा तुकडा त्यांच्यासमोर टाकून संबंधिताला गप्प करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते. त्यामुळे नांदेड पोलीस दलात गेल्या काही वर्षापासून स्वतःला डॉन समजणाऱ्या या पत्रकाराचा पडदा फार्स करण्याची खरी गरज होती परंतु नांदेड जिल्ह्यातील भल्या भल्या गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलिस दलाला या डासाने चावा घेतल्यामुळे या विभागालाही पैसे देण्याचा मलेरिया झाल्याची चर्चा आहे . त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या विभागातील अधिकाऱ्यांची बारकाईने माहिती मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न केला जातो . पोलीस विभागातील काही छुपे खबरी यांचा वापर करून संबंधित अधिकाऱ्यांची अत्यंत गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यांसमोर गाडी घोडी , कर्ज फेडण्याचा प्रस्ताव ठेवला जातो. हा प्रस्ताव अधिकाऱ्याने स्वीकारला तर ठीक अन्यथा अत्यंत खालच्या पातळीवर येऊन बातमी दिली जाते. ही बातमी लिहीत असताना संबंधित विभागाच्या इज्जतीची लक्तरे वेशिवर टांगली जातात . सर्राईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवाळून त्यांना सरळ करणाऱ्या पोलीस विभागांला सोळो कि पळो करून सोडणार्‍या या हैवान पत्रकाराचा बंदोबस्त करण्याची हिम्मत मात्र नांदेड पोलीस दलात नाही काय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आहे. एक ना अनेक गुन्हे दाखल असलेला हा पत्रकार पोलिसांमध्ये मात्र उजळ माथ्याने फिरत आहे. काही प्रकरणात त्याला जामीन झाला नसतानाही काही अधिकारी त्याला पाठीशी घालतात ही मात्र तेवढीच केविलवाणी बाब आहे . सर्वसामान्य नागरिकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मध्ये रात्री जाऊन त्याला उचलण्याचे धाडस दाखवणारे नांदेड पोलीस संबंधित गुन्हे बहाद्दर पत्रकार सोबत चहापाणी आणि फुकण्या फुकतात ही किळसवाणी बाब आहे .त्यामुळे संबंधित पत्रकाराची गेल्या अनेक वर्षापासून या विभागात सारखी दिवाळी सुरू आहे . जर या विभागात कछवा अगरबत्ती लागली तर हा मच्छर बोंबलत बाहेर जाईल आणि त्याच्या आयुष्यात शिमगा सुरू होईल अशा चर्चा सुरू आहे. पोलीस दलामध्ये सिंहासन, राजवाडा किंवा अन्य कोणतेही श्रृंगारिक अशी आसनं नसतात . पोलीस अधिकारी कर्मचारी हा सर्वसामान्यांच्या हितासाठी अंगावर खाकी वर्दी घातलेला असतो. तो त्याचे कर्तव्य बजावत असतो. त्या कर्तव्य बजावण्याच्या मोबदल्यात त्याला सर्वसामान्यांच्या घामातून गाळलेल्या आणि जमा केलेल्या महसुलातून दर महिन्याला पगार दिला जातो . त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी एखादे दमदार काम केले असेल तर निश्चितपणे त्याचे कौतुकच परंतु सिंहासन, सिंह, वाघ असे काही नसते. परंतु बकरा, शेळी, मांजर करण्यासाठी अशा स्वयंघोषित पत्रकारांचा वापर करून एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याचा काटा काढला जातो एवढे मात्र खरे . यापूर्वी एलसीबी मध्ये येण्यासाठी दोन अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद निर्माण करण्यासाठीही या पुळचट महाभाग पत्रकाराने अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती ही चर्चा नवीन आहे. त्यामुळे चांगल्या अधिकाऱ्याला काम करू देणे उचितच परंतु एखाद्या अधिकाऱ्याची अवास्तव अतियोशक्ति करणारी स्तुतीसुमनाने उधळुन पत्रकारितेची लाज घालऊ नये याची जाणीव किमान त्या पत्रकारांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ठेवणे आवश्यक आहे . असे असले तरी लवकरच नांदेड एलसीबीत कछवा अगरबत्ती लावली जाणार असून रक्त पिपासू मच्छरांचा समूळ नायनाट केला जाणार असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे तूर्तास या मच्छराची दिवाळी येथे होईल त्यानंतर शिमगा सुरु होईल असे बोलले जाते.

No comments:

Post a Comment

पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर, दि.६, (विमाका) :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील  प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आ...