पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात मोठी क्रांती होत आहे. देश सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाची प्रतिमा अत्यंत प्रभावशाली राहिली असून देश जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ही वाटचाल यशस्वी होण्यासाठी आज सादर झालेला अर्थसंकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या अर्थ संकल्पाने महिलांना आर्थिक चाचणीतून बाहेर काढले असून घरचे बजेट ही व्यवस्थित सांभाळता यावे अशा तरतुदी केल्या आहे. घरगुती वापराच्या गॅस दरात कपात करण्यात आली आहे. शिवाय टॅक्स स्लॅब वाढू दिला नाही त्यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेती आणि कृषी क्षेत्रालाही हा अर्थ संकल्प नवी दिशा देणारा ठरणार आहे. देशाची संरक्षण यंत्रणा अधिक भक्कम ठेवण्यासाठीही हा अर्थ संकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिक्षण , आरोग्य याही बाबींसाठी भरीव तरतूद करण्यात आल्याने आगामी कळत भारत आर्थिक महासत्ता नक्की होईल अशी प्रतिक्रिया खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
छत्रपती संभाजीनगर, दि.६, (विमाका) :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आ...
-
छत्रपती संभाजीनगर, दि.६, (विमाका) :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आ...
-
नांदेड/ प्रतिनिधी- भांबुर्डा तालुका पुणे येथील रामोशी समाजास इंग्रज सरकारने त्यांच्या कामावर खुश होऊन 102 एकर जमीन भेट दान दिल...
-
नांदेड जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहीती काढुन त्यांचेविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्य...
No comments:
Post a Comment